मुख्य सामग्रीवर वगळा
गरीब व गरजू व्यक्तिंसाठी जीवनावश्यक वस्तुंची कीट द्या

v दानशूर व्यक्ती व सामाजिक संघटनांना प्रशासनाचे आवाहन
यवतमाळ, दि. 22 : 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रभावित व्यक्तिंना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, व्यावसायिक, उद्योजक, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आदी जण आपापल्या परीने समोर येऊन मदत करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातसुध्दा हे मदतकार्य सुरू आहे. मात्र तरीसुध्दा या संकटामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे जिल्ह्यातील गरीब व गरजू व्यक्तिंसाठी सामाजिक संघटना, उद्योजक, दानशूर व्यक्तिंनी जीवनावश्यक वस्तुंची किट उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोरोनाच्या संकटामधून सावरण्याकरीता गोर गरीब तसेच गरजू व्यक्तिंना द्यावयाच्या जीवनावश्यक किटमध्ये 10 किलो गहू आटा, 3 किलो तांदूळ, 1 किलो साखर, 100 ग्रॅप चहापुडा, 200 ग्रॅम मिरची पावडर, 100 ग्रॅप हळद, 1 मीठ पुडा, 1 किलो तूर डाळ, 1 किलो तेल, 1 किलो चना, 1 किलो मटकी, 2 साबण या वस्तु असल्यास गरजूंना मदत होऊ शकते.
वरील सर्व वस्तु असलेली धान्यकिट सामाजिक संस्था, व्यावसायिक प्रतिष्ठान, औद्योगिक संकूल, दानशूर व्यक्तिंनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे उपलब्ध करून द्यावी. या धान्य किटवर संबंधितांनी आपला लोगो वापरला तरी हरकत नाही. सदर धान्य किट जिल्हा प्रशासनाकडून गरजू व्यक्तिंना वाटप करण्यात येईल. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून संबंधितांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
फोटो कॅप्शन : किट वाटपाचे संग्रहित छायाचित्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...