मुख्य सामग्रीवर वगळा
लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी / कामगारांना मिळणार पासेस,
तहसीलदारांना इन्सिडंट कमांडर म्हणून पासेस देण्याचे अधिकार प्रदान


यवतमाळ, दि. 19 : विदर्भ मुकाबला न्यूज़-
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत दि. 20 एप्रिलपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक आस्थापना व तेथे काम करणारे कर्मचारी / कामगारांना पासेस देण्यासाठी नियोजन केले आहे. यासंदर्भात इन्सिडंट कमांडर म्हणून जिल्ह्यातील तहसीलदारांना पासेस देण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या आदेशान्वये प्रदान करण्यात आले आहे.
जिल्ह्यात साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील तरतुदींची व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ची यशस्वी अंमलबजावणी तसेच प्रतिबंध क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये सुट देण्यात आलेल्या कार्यालयातील कामांच्या ठिकाणी, कारखाने, प्रतिष्ठाने आदी ठिकाणी कामावर हजर होण्यासाठी कर्मचा-यांना व कामगारांना पासेस देण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व तहसीलदारांना इन्सिडंट कमांडर म्हणून पासेस देण्याचे अधिकार देण्यात आले आहे. यासाठी कार्यपध्दती निश्चित केली आहे.
जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात (यवतमाळ शहरात प्रभाग क्रमांक 10 व प्रभाग क्रमांक 20) कोणतेही कार्यालय, कारखाना, प्रतिष्ठान सुरू करता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रातून कोणत्याही कर्मचा-यांना, कामगारांना दुकाने, प्रतिष्ठाने, कारखान्यांमध्ये बोलाविता येणार नाही. किंवा या क्षेत्रातून कोणीही बाहेर जाऊ शकणार नाही. तहसीलदारांनी पासेस देतांना अनावश्यक लोकांना पासेस दिल्यामुळे शहरात गर्दी वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रतिष्ठाने, कारखाने आदींना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याबाबत त्यांना अवगत करावे. कर्मचारी / कामगार यांची आरोग्य तपासणी करून घेण्याबाबत संबंधित मालकांना सुचना कराव्यात. कर्मचा-यांचा आरोग्य तपासणीचा अहवाल मालकांनी पास दिल्यापासून 48 तासांच्या आत सादर केला नाही तर त्यांची प्रतिष्ठाने बंद करावीत. तसेच त्यांच्यावर आवश्यक कार्यवाही करावी. शासनाच्या आदेशाचे व सुचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत मालकांना व कर्मचा-यांना करण्याबाबत अवगत करावे.
काम सुरू असलेली ठिकाणे, प्रतिष्ठाने, कारखाने यांचा परिसर निर्जंतुकीकरण करून घ्यावा तसेच नियमितपणे परिसर निर्जंतुकीकरण केला नाही तर परवानगी रद्द करावी. जास्त वय असणारे कामगार किंवा शारीरिक व्याधी असलेल्या कामगारांना कामावर बोलाविता येणार नाही. एकूण कर्मचारी क्षमतेच्या फक्त्‍ 30 टक्के कर्मचा-यांना कामावार आळीपाळीने बोलवावे. कामाच्या ठिकाणी व कामामुळे होणा-या गर्दीमुळे जर कोव्हिड - 19 चा प्रादुर्भाव वाढला किंवा त्याचा सामाजिक स्तरावर प्रसार झाला तर त्यास संबंधित मालक व्यक्तिश: जबाबदार राहतील.
इन्सिडंट कमांडर यांनी त्यांच्या स्तरावर आवश्यक तेवढे भरारी पथके तयार करावीत. या भरारी पथकाकडून शासनाच्या आदेशाप्रमाणे काम न झाल्यास किंवा हयगय करणा-यांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी. शक्य तेथे कामाच्या ठिकाणी संबंधित कारखाने, प्रतिष्ठाने यांनी फिवर क्लिनिक सुरू करावे. व जेथे शक्य नाही तेथे जवळच्या फिवर क्लिनिकद्वारे कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर्स, मास्क, हात धुण्यासाठी साबण नियमित उपलब्ध करून द्यावेत व सामाजिक अंतर राखल्या जाईल याची काळजी घ्यावी. पासेस देतांना पासची एक प्रत स्थानिक पोलिस प्रशासनास माहिती व आवश्यक कार्यवाहिस्तव देण्यात यावी. पासेस दिल्याचा दैनंदिन अहवाल या कार्यालयास सादर करावा. अशा सुचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात शिथिलता असली तरी नागरिकांनी शासनाच्या व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. सामाजिक अंतर राखूनच सुट देण्यात आलेले दैनंदिन व्यवहार करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...