संचारबंदीत नियम मोडणाऱ्यांकडून पावणेतीन लाख दंड वसूल
यवतमाळ, दि. 19 : विदर्भ मुकाबला न्यूज-
संचारबंदीच्या काळात शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणा-यांविरुध्द प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून 822 प्रकरणात 2 लाख 77 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याअगोदरच्या दिवशीही ५१७ प्रकरणात 2 लाख 11 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला होता.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये विविध अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, सामाजिक अंतर ठेवणे, किराणा दुकानात दर्शनी भागात दरपत्रक लावणे यासारख्या विविध सूचनांचा समावेश आहे. तरीदेखील या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनामार्फत वरील कारवाई करत दंड वसूल करण्यात आला आहे.
काल दिवसभरात सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावल्याबद्दल जिल्ह्यातील 636 प्रकरणात प्रती व्यक्ती 200 रुपये प्रमाणे एकूण 1 लाख 27 हजार 200 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल एकूण 17 प्रकरणात प्रती व्यक्ती 500 रुपये प्रमाणे 8500 रुपये दंड वसुल करण्यात आला. तसेच दुकानांसमोर सामाजिक अंतर न ठेवल्याबद्दल 109 प्रकरणात प्रती व्यक्ती 200 प्रमाणे रुपयेप्रमाणे एकूण 21 हजार 800रुपये तसेच दुकानदारांनी सामाजिक अंतर ठेवण्याची व्यवस्था न केल्याने 46 प्रकरणात 2000 प्रमाणे 92 हजार रुपये तर किराणा दुकानात दरपत्रक न लावल्याबद्दल प्रती दुकानमालक यांचेकडून 2 हजार रुपये प्रमाणे 14 प्रकरणात 28 हजार रुपये असा एकूण 2 लाख 77 हजार 500 रुपये दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा