मुख्य सामग्रीवर वगळा
जिल्ह्यातील 19 लक्ष नागरिकांना मिळणार मोफत तांदूळ


                                                                 - पालकमंत्री संजय राठोड

⏩ अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांचा समावेश

⏩ एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अतिरिक्त वाटप

यवतमाळ दि.  2 : 
कोरोना विषाणु (कोव्हिड-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून कलम 144 ची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहे. याची झळ सर्वांनाच बसत आहे. मात्र रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणा-या गरीब आणि गरजू नागरिकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील 19 लक्ष 28 हजार 953 नागरिकांना प्रतिमहिना प्रतिव्यक्ति पाच किलो अतिरक्त तांदूळ देण्यात येणार आहे. हे वाटप नियमित धान्याच्या व्यतिरिक्त असून एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने तांदूळ देण्यात येईल, असे राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते जून या तीन महिन्यात मोफत तांदळाचे वाटप करण्यात येईल. जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांची संख्या 1 लक्ष 22 हजार 622 असून सदस्य संख्या 5 लक्ष 28 हजार 623 आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांची संख्या 3 लक्ष 13 हजार 219 आहे. यातील सदस्य संख्या 14 लक्ष 330 आहे. अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत एकूण 19 लक्ष 28 हजार 953 लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो प्रति माह असे तीन महिने मोफत तांदूळ देण्यात येईल. यासाठी अंत्योदय अंतर्गत मा‍सिक नियतन 2643 मेट्रीक टन तर प्राधान्य कुटुंब अंतर्गत मासिक नियतन 7002 मेट्रीक टन तांदूळ लागणार आहे. तीन महिन्यात दोन्ही योजनेंतर्गत एकूण 28935 मेट्रीक टन तांदूळ वाटण्यात येणार आहे. या मालाची उचल सुरू असून स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

मोफत तांदळाचे वाटप करतांना त्या लाभार्थ्यांनी नियमित अन्नधान्याची उचल केली आहे की नाही, याची खतरजमा करण्यात येईल. लोकांना मोफत तांदूळ वाटण्यासाठी विहित कालावधीत तांदळाची उचल होणे गरजेचे आहे. यात कसूर केल्यास संबंधित अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे शासन आदेशात म्हटले आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदूळ स्वीकारतांना शासनाच्या निर्देशानुसार नमुने घ्यावे. तसेच संयुक्तपणे तांदळाचा दर्जा तपासून तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच उचल करावी. तांदळाचे वितरण करतांना रास्तभाव दुकानदारांनी ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरीत करणे अनिवार्य आहे, असे आदेशात नमुद आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू

  द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू यवतमाळ : 14 एप्रिल राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजतापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 'ब्रेक द चेन' अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. या कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी जिल्ह्याकरीता आदेश निर्गमित केले आहे.             संचारबंदीची अंमलबजावणी : संचारबंदीच्या कालावधी कोणत्याही व्यक्तिस अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या बाबी वगळता इतर सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रमे, सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवेमध्ये वर्गवारी केलेल्या सेवा व उपक्रम यांना कामकाजाच्या सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत मुभा राहील.             अत्यावश्यक सेवेमध्ये सुरू राहणा-या बाबी : रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने व औषधी कंपन्या, औषधी व आरोग्य सेवा व औषध निर्मिती करणारे कारखाने तसेच त्य...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट        पुसद : महानायक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे नवनियुक्त पुसद आदिवासी विकास समिती अध्यक्ष तथा आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य प्रतिमेची भेट देण्यात आली. बिरसाचे विचार समस्त युवकांनी अंगीकारून वंचितांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन भेट सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी सर , जी प सदस्य गजानन उघडे , वसंता  चिरमाडे , पुंडलिक  टारफे , श्रीकांत चव्हाण , राज्य संघटक जीवन फोपसे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कर्मचारी संघटनेचे तालुका सचीव संदेश पांडे , आ.विकास परिषदेचे सचिव सुरेश बोके , श्री खूपसे , जयवंत भुरके , तुकाराम भुरके , समाधान टारफे , गंगाराम काळे साहेब , रामदास शेळके , विजय टारफे , दत्ता भडंगे , दशरथ भुरके , समाधान चोंढकर , हनुमान गोदमले , भगवान सुरोशे , सुरेश पित्रे , बालाजी शे...