मुख्य सामग्रीवर वगळा
जिल्ह्यातील 19 लक्ष नागरिकांना मिळणार मोफत तांदूळ


                                                                 - पालकमंत्री संजय राठोड

⏩ अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांचा समावेश

⏩ एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अतिरिक्त वाटप

यवतमाळ दि.  2 : 
कोरोना विषाणु (कोव्हिड-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून कलम 144 ची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहे. याची झळ सर्वांनाच बसत आहे. मात्र रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणा-या गरीब आणि गरजू नागरिकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील 19 लक्ष 28 हजार 953 नागरिकांना प्रतिमहिना प्रतिव्यक्ति पाच किलो अतिरक्त तांदूळ देण्यात येणार आहे. हे वाटप नियमित धान्याच्या व्यतिरिक्त असून एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने तांदूळ देण्यात येईल, असे राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते जून या तीन महिन्यात मोफत तांदळाचे वाटप करण्यात येईल. जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांची संख्या 1 लक्ष 22 हजार 622 असून सदस्य संख्या 5 लक्ष 28 हजार 623 आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांची संख्या 3 लक्ष 13 हजार 219 आहे. यातील सदस्य संख्या 14 लक्ष 330 आहे. अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत एकूण 19 लक्ष 28 हजार 953 लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो प्रति माह असे तीन महिने मोफत तांदूळ देण्यात येईल. यासाठी अंत्योदय अंतर्गत मा‍सिक नियतन 2643 मेट्रीक टन तर प्राधान्य कुटुंब अंतर्गत मासिक नियतन 7002 मेट्रीक टन तांदूळ लागणार आहे. तीन महिन्यात दोन्ही योजनेंतर्गत एकूण 28935 मेट्रीक टन तांदूळ वाटण्यात येणार आहे. या मालाची उचल सुरू असून स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

मोफत तांदळाचे वाटप करतांना त्या लाभार्थ्यांनी नियमित अन्नधान्याची उचल केली आहे की नाही, याची खतरजमा करण्यात येईल. लोकांना मोफत तांदूळ वाटण्यासाठी विहित कालावधीत तांदळाची उचल होणे गरजेचे आहे. यात कसूर केल्यास संबंधित अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे शासन आदेशात म्हटले आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदूळ स्वीकारतांना शासनाच्या निर्देशानुसार नमुने घ्यावे. तसेच संयुक्तपणे तांदळाचा दर्जा तपासून तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच उचल करावी. तांदळाचे वितरण करतांना रास्तभाव दुकानदारांनी ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरीत करणे अनिवार्य आहे, असे आदेशात नमुद आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यवतमाल जिले के तरोडा गांव में शहीद जवान रहाटे को दीगई अंतिम विदाई. अरणी:- प्रतिनिधि (शाहरुख काझी) महाराष्ट्र के गडचिरोली में 1 तारीख को हुए नक्सली हमले में शहीद जवान आग्रमन रहाटे को उसके गांव में अंतिम विदाई दे दी गई लेकिन इनके परिजनों ने इनकी टुकड़ी का नेतृत्व करने वाले अधिकारी की मिलीभगत से यह हादसा होने का गंभीर आरोप लगाया है गडचिरोली के कुरखेड़ा में 1 मई के दिन नक्सलियों द्वारा पुलिस गाड़ी को विस्फोट से उड़ाकर 15 जवानों को शहीद किया था उनमें से एक यवतमाल जिले के अरणी तहसील के तरोड़ा गांव का जवान अग्रमन रहाटे भी शहीद हुआ है शहीद जवान के गांव में 3 में को नम आंखों से अंतिम विदाई दे दी गई शहीद के परिजनों ने इस हमले को इनका नेतृत्व करने वाला अधिकारी काले के मिलीभगत से अंजाम दिया गया है ऐसा गंभीर आरोप लगाया है इस अधिकारी पर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है.
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
टीप्पर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान,एक जखमी   पुसद प्रतिनिधी (प्रा. अकरम शेख) पुसद/ दि.१३ पी एन कॉलेज व फार्मसी कॉलेज च्या दरम्यान असलेल्या एका जगदंबा टी सेंटर मध्ये अचानक टीप्पर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजो दुपारी एक वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.           याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की पुसद दिग्रस मार्गावरील फुलसिंग नाईक महाविद्यालय व फार्मसी कॉलेजच्या मध्यभागात असलेल्या चौकातील नूतनताई क-हाले यांच्या घरामध्येच हॉटेल व पानठेला हा व्यवसाय चालू असताना अचानकपणे दुपारी दिग्रस रोड कडून पुसद कडे येणाऱ्या टीप्पर क्रमांक एम पी 09/जी आई  7785 ने  पोलिस ब्रेकेट तोडून हॉटेलला जबर धडक दिली त्यामध्ये पानठेला, हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हॉटेल समोर असलेल्या स्कुटी क्रमांक एम एच 29/बी एल  5110 क्रमांकाच्या ॲक्टिवा गाडीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी भरती केले  तर घर मालक तथा हॉटेलचे मालक असलेल्या नूतनताई क-हाळे यांनी हा प्रत्यक्