औषधी निर्यात करण्यापुर्वी क्लोरोक्वीन चा पर्याप्त साठा करावा, सिकंदर शहा यांचे केन्द्र सरकारला निवेदन.
यवतमाळ :-
केन्द्रातील मोदी सरकार अमेरीकेने दमदाटी करताच दबावात आल्याचे दिसून येत आहे. त्यांनी कुठलाच विचार न करता अमेरीकेसह इतर देशांना क्लोरोक्विन सह इतर औषधींचा पुरवठा करण्याचा निर्णय घोषीत केला. यामुळे देशातील नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून औषधी निर्यात करण्यापुर्वी क्लोरोक्वीन चा पर्याप्त साठा करावा असे निवेदन नागरीकांच्या वतीने शेतकरी वारकरी पक्षाचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केन्द्र सरकारला पाठविले आहे.
भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. आज पाच हजार पेक्षाही जास्त रुग्ण भारतात उपचार घेत आहे. यामध्ये 164 नागरीकांचा मृत्यू झाला आहे. या आजारावर कुठलाच उपचार नसल्यामुळे जगात वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत असतांनाही मरणा-यांची संख्या 80 हजाराच्या वर गेली आहे. भारतात एकीकडे 1 अब्ज 37 कोटी लोकसंख्या आहे. दुसरीकडे पर्याप्त वैद्यकीय सुविधा सुध्दा उपलब्ध नाही. त्यामुळे क्लोरोक्विन सारखी औषधी जर कोरोनावर उपाय ठरत असेल तर ही औषधी भारतीयांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. भारतातील मोदी सरकार मात्र अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंम यांनी धमकी देताच नतमस्तक झाल्याचे दिसून येत आहे. कुठलाच विचार न करता दुस-याच दिवशी निर्यात वर केलेली बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे भारतात मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास औषधीचा तुटवडा जानवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे.
-------------------------------------------------------------------
कोरोनाला सरकारने गंभीरतेने घ्यावे
यवतमाळच्या अनेकांचे नमुने पाठवून पाच दिवस झाले मात्र अद्यापही त्यांचे रिपोर्ट प्राप्त झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाची पुढची प्रक्रिया थंड बस्त्यात पडल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार संपुर्ण देशात आहे. कोरोनाची टेस्ट अत्यल्प होत आहे. त्यामुळे रोज वाढणारा आकडा हा अचानक मोठया प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशातच औषधीचा साठा पर्याप्त नसल्यास त्याचे परीनाम नागरीकांना भोगावे लागतील. म्हणून केन्द्र सरकारला नागरीकांच्या वतीने मी निवेदन पाठविले आहे.
सिकंदर शहा
अध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना
यवतमाळ :-
केन्द्रातील मोदी सरकार अमेरीकेने दमदाटी करताच दबावात आल्याचे दिसून येत आहे. त्यांनी कुठलाच विचार न करता अमेरीकेसह इतर देशांना क्लोरोक्विन सह इतर औषधींचा पुरवठा करण्याचा निर्णय घोषीत केला. यामुळे देशातील नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून औषधी निर्यात करण्यापुर्वी क्लोरोक्वीन चा पर्याप्त साठा करावा असे निवेदन नागरीकांच्या वतीने शेतकरी वारकरी पक्षाचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केन्द्र सरकारला पाठविले आहे.
भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. आज पाच हजार पेक्षाही जास्त रुग्ण भारतात उपचार घेत आहे. यामध्ये 164 नागरीकांचा मृत्यू झाला आहे. या आजारावर कुठलाच उपचार नसल्यामुळे जगात वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत असतांनाही मरणा-यांची संख्या 80 हजाराच्या वर गेली आहे. भारतात एकीकडे 1 अब्ज 37 कोटी लोकसंख्या आहे. दुसरीकडे पर्याप्त वैद्यकीय सुविधा सुध्दा उपलब्ध नाही. त्यामुळे क्लोरोक्विन सारखी औषधी जर कोरोनावर उपाय ठरत असेल तर ही औषधी भारतीयांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. भारतातील मोदी सरकार मात्र अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंम यांनी धमकी देताच नतमस्तक झाल्याचे दिसून येत आहे. कुठलाच विचार न करता दुस-याच दिवशी निर्यात वर केलेली बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे भारतात मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास औषधीचा तुटवडा जानवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे.
-------------------------------------------------------------------
कोरोनाला सरकारने गंभीरतेने घ्यावे
यवतमाळच्या अनेकांचे नमुने पाठवून पाच दिवस झाले मात्र अद्यापही त्यांचे रिपोर्ट प्राप्त झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाची पुढची प्रक्रिया थंड बस्त्यात पडल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार संपुर्ण देशात आहे. कोरोनाची टेस्ट अत्यल्प होत आहे. त्यामुळे रोज वाढणारा आकडा हा अचानक मोठया प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशातच औषधीचा साठा पर्याप्त नसल्यास त्याचे परीनाम नागरीकांना भोगावे लागतील. म्हणून केन्द्र सरकारला नागरीकांच्या वतीने मी निवेदन पाठविले आहे.
सिकंदर शहा
अध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा