यवतमाळ जिल्हयतिल आर्णी बायपास रस्ता बांधण्या साठी हसूल राज्यमंत्री ना.राठोड यांचे दुर्लक्ष
दिग्रस :-
स्मशान भूमी रोड कडून आर्णी करिता जाण्यासाठी बायपास बनवण्यासाठी आला. त्याकरित्या बायपास जाणाऱ्या रस्तावरील अनेक नागरिकांच्या जमिनीचे शासनाने भूमी अधिग्रहण केले परंतु ३ वर्ष लोटून गेले, अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारल्या तरी सुद्धा आणखीही त्या ९ नागरिकानां शासनाने केलेल्या भूमिअधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. आम्हाला मोबदला लवकर न मिळाल्यास आम्ही तेथेच घर बांधणार असल्याचा इशारा प्लॉटधारकांनी दिला आहे.
४ वर्षा आधी दिग्रस-आर्णी बायपास करिता रस्ता मंजूर करण्यात आला. त्याकरिता तेथील प्लॉटधारकांच्या जमिनी शासनाने घेतल्या व लवकरच आपल्याला याचा मोबदला देण्यात येईल असे आश्वासनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले. मात्र ४ वर्ष उलटूनही त्या ९ प्लॉटधारकांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. तो मोबदला लवकरात लवकर द्यावा याकरिता अनेक वेळा तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच दिग्रस-दारव्हा मतदारसंघाचे आमदार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन देऊनही याकडे त्यांनी लक्षच दिले नसल्याने आता लवकरात लवकर आम्हा प्लॉटधारकांना भूमी अधिग्रहणाचा मोबदला न दिल्यास आम्ही आमच्या प्लॉट वर बांधू असा इशारा प्लॉट धारकांनी दिला आहे. आता यावर प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भूमी अधिग्रहण पुर्ण झाले नसल्याने तेव्हा तो रस्ता स्मशानभूमीपर्यंतच बनविण्यात आला होता. तेव्हा पासून तो रस्ता तसाच आहे तो अजूनही तयार केला गेला नाही. रस्ता पूर्ण न झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस येताच या रस्त्यावर चिखल होत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.
दिग्रस :-
४ वर्षा आधी दिग्रस-आर्णी बायपास करिता रस्ता मंजूर करण्यात आला. त्याकरिता तेथील प्लॉटधारकांच्या जमिनी शासनाने घेतल्या व लवकरच आपल्याला याचा मोबदला देण्यात येईल असे आश्वासनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले. मात्र ४ वर्ष उलटूनही त्या ९ प्लॉटधारकांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. तो मोबदला लवकरात लवकर द्यावा याकरिता अनेक वेळा तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच दिग्रस-दारव्हा मतदारसंघाचे आमदार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन देऊनही याकडे त्यांनी लक्षच दिले नसल्याने आता लवकरात लवकर आम्हा प्लॉटधारकांना भूमी अधिग्रहणाचा मोबदला न दिल्यास आम्ही आमच्या प्लॉट वर बांधू असा इशारा प्लॉट धारकांनी दिला आहे. आता यावर प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भूमी अधिग्रहण पुर्ण झाले नसल्याने तेव्हा तो रस्ता स्मशानभूमीपर्यंतच बनविण्यात आला होता. तेव्हा पासून तो रस्ता तसाच आहे तो अजूनही तयार केला गेला नाही. रस्ता पूर्ण न झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस येताच या रस्त्यावर चिखल होत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा