मुख्य सामग्रीवर वगळा
राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : 


जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी


तात्काळ शेतकऱ्यांना मदत न दिल्यास आंदोलनाचा इशारा : आ डॉ वजाहत मिर्झा


यवतमाळ दि 31 जुलै: 
यवतमाळ जिल्ह्यातुन नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग चे काम सुरू असून सदर यंत्रणेने शेतकऱ्यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजविल्या व नव्याने पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खोदल्या नाही तसेच पाणी वाहून जाणारे पाईप चुकीच्या पद्धतीने टाकल्याने पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात व इतर जागेत गेल्याने पिके वाहून जाण्यासह प्रचंड नुकसान झाले, याची तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाही करण्यात यावी तसेच अश्या चुकीच्या नियोजनाने अनेक गावातील वस्तीत सुद्धा पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तात्काळ मदत देण्यात यावी.

यवतमाळ जिल्यात गेल्या तीन दिवसात अचानक झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली त्याच पद्धतीने शेतीतील पिके वाहून गेली व शेत जमीन खरडून गेल्या असून संबधित शेतकरी व राहिवाश्यांना तात्काळ  मदत जाहीर करण्याच्या मागणी साठी दि 31 जुलै रोजी देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना यवतमाळ जिल्ह्याधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आहे यात तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी अशोकराव बोबडे, बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, चंद्रशेखर चौधरी, धनराज चव्हाण, साहेबराव खडसे, जावेद अन्सारी,  दिनेश गोगरकर, नितीन जाधव, अनिल गायकवाड, शब्बीर खान, बबली भाई, सिकंदर शहा, संजय ठाकरे, अमन निर्बन, जाफर खान, कृष्णा पुसनाके, अजय चौपाणे, अजय किन्हीकर, घनश्याम दरणे, मिलिंद रामटेके, अतुल राऊत, जितेश नावाडे, शिर्के साहेब, बाळासाहेब काळे, रमेश कन्नके, हुसेन खान, चंदन खडसे, गजानन नवदुर्गे, उमेश इंगळे, अरुण ठाकूर, ललित जैन, कुणाल जतकर, अशोक शिर्के, यांचे सह अनेक पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
----------------------------------------------------
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला याबाबत पूर्ण कल्पना असतांनाही त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात, गावातील घरात व मालमत्ता धारकांच्या जागेत पाणी घुसू दिले ही बाब योग्य नसून योग्य पद्धतीने पाण्याचा निचरा होण्याची जवाबदारी त्यांची होती आता तात्काळ प्रशासनाने मदत जाहीर करावी तसेच ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले त्यांना मदत घ्यावी अन्यथा आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आंदोलन करण्याचा इशारा आ. डॉ वाजाहत मिर्झा यांनी दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...