राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या :
जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी
तात्काळ शेतकऱ्यांना मदत न दिल्यास आंदोलनाचा इशारा : आ डॉ वजाहत मिर्झा
यवतमाळ दि 31 जुलै:
यवतमाळ जिल्ह्यातुन नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग चे काम सुरू असून सदर यंत्रणेने शेतकऱ्यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजविल्या व नव्याने पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खोदल्या नाही तसेच पाणी वाहून जाणारे पाईप चुकीच्या पद्धतीने टाकल्याने पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात व इतर जागेत गेल्याने पिके वाहून जाण्यासह प्रचंड नुकसान झाले, याची तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाही करण्यात यावी तसेच अश्या चुकीच्या नियोजनाने अनेक गावातील वस्तीत सुद्धा पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तात्काळ मदत देण्यात यावी.
यवतमाळ जिल्यात गेल्या तीन दिवसात अचानक झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली त्याच पद्धतीने शेतीतील पिके वाहून गेली व शेत जमीन खरडून गेल्या असून संबधित शेतकरी व राहिवाश्यांना तात्काळ मदत जाहीर करण्याच्या मागणी साठी दि 31 जुलै रोजी देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना यवतमाळ जिल्ह्याधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आहे यात तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी अशोकराव बोबडे, बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, चंद्रशेखर चौधरी, धनराज चव्हाण, साहेबराव खडसे, जावेद अन्सारी, दिनेश गोगरकर, नितीन जाधव, अनिल गायकवाड, शब्बीर खान, बबली भाई, सिकंदर शहा, संजय ठाकरे, अमन निर्बन, जाफर खान, कृष्णा पुसनाके, अजय चौपाणे, अजय किन्हीकर, घनश्याम दरणे, मिलिंद रामटेके, अतुल राऊत, जितेश नावाडे, शिर्के साहेब, बाळासाहेब काळे, रमेश कन्नके, हुसेन खान, चंदन खडसे, गजानन नवदुर्गे, उमेश इंगळे, अरुण ठाकूर, ललित जैन, कुणाल जतकर, अशोक शिर्के, यांचे सह अनेक पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
----------------------------------------------------
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला याबाबत पूर्ण कल्पना असतांनाही त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात, गावातील घरात व मालमत्ता धारकांच्या जागेत पाणी घुसू दिले ही बाब योग्य नसून योग्य पद्धतीने पाण्याचा निचरा होण्याची जवाबदारी त्यांची होती आता तात्काळ प्रशासनाने मदत जाहीर करावी तसेच ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले त्यांना मदत घ्यावी अन्यथा आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आंदोलन करण्याचा इशारा आ. डॉ वाजाहत मिर्झा यांनी दिला.
जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी
तात्काळ शेतकऱ्यांना मदत न दिल्यास आंदोलनाचा इशारा : आ डॉ वजाहत मिर्झा
यवतमाळ दि 31 जुलै:
यवतमाळ जिल्ह्यातुन नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग चे काम सुरू असून सदर यंत्रणेने शेतकऱ्यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजविल्या व नव्याने पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खोदल्या नाही तसेच पाणी वाहून जाणारे पाईप चुकीच्या पद्धतीने टाकल्याने पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात व इतर जागेत गेल्याने पिके वाहून जाण्यासह प्रचंड नुकसान झाले, याची तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाही करण्यात यावी तसेच अश्या चुकीच्या नियोजनाने अनेक गावातील वस्तीत सुद्धा पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तात्काळ मदत देण्यात यावी.
यवतमाळ जिल्यात गेल्या तीन दिवसात अचानक झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली त्याच पद्धतीने शेतीतील पिके वाहून गेली व शेत जमीन खरडून गेल्या असून संबधित शेतकरी व राहिवाश्यांना तात्काळ मदत जाहीर करण्याच्या मागणी साठी दि 31 जुलै रोजी देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना यवतमाळ जिल्ह्याधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आहे यात तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली.
----------------------------------------------------
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला याबाबत पूर्ण कल्पना असतांनाही त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात, गावातील घरात व मालमत्ता धारकांच्या जागेत पाणी घुसू दिले ही बाब योग्य नसून योग्य पद्धतीने पाण्याचा निचरा होण्याची जवाबदारी त्यांची होती आता तात्काळ प्रशासनाने मदत जाहीर करावी तसेच ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले त्यांना मदत घ्यावी अन्यथा आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आंदोलन करण्याचा इशारा आ. डॉ वाजाहत मिर्झा यांनी दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा