मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू

  द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू यवतमाळ : 14 एप्रिल राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजतापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 'ब्रेक द चेन' अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. या कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी जिल्ह्याकरीता आदेश निर्गमित केले आहे.             संचारबंदीची अंमलबजावणी : संचारबंदीच्या कालावधी कोणत्याही व्यक्तिस अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या बाबी वगळता इतर सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रमे, सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवेमध्ये वर्गवारी केलेल्या सेवा व उपक्रम यांना कामकाजाच्या सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत मुभा राहील.             अत्यावश्यक सेवेमध्ये सुरू राहणा-या बाबी : रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने व औषधी कंपन्या, औषधी व आरोग्य सेवा व औषध निर्मिती करणारे कारखाने तसेच त्य...

पहापळ येथील राहुल वऱ्हाडे जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी उत्तीर्ण

पहापळ येथील राहुल वऱ्हाडे जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी उत्तीर्ण  पांढरकवडा: महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे केळापुर तालुक्यातील पहापळ येथील राहुल वऱ्हाडे या युवकाने जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी करीता २०१७ मध्ये प्रवेश घेतला या वर्षी २०२० मध्ये तृतीय वर्षात जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी राहुल वऱ्हाडे हे प्रथम श्रेणीत ६४.१३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. पहापळ येथील सर्वसामान्य परिवारातील राहुल वऱ्हाडे शिक्षणासोबत सामाजिक कार्यात सतत अग्रसेर राहते. या वर्षी कृषी विद्यालय कोंघारा येथून कृषी तंत्र पदविका मधे यश संपादन केले असून आता जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी मध्ये पन यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून पत्रकारीतेची पदवी प्राप्त केल्या बद्दल राहुलचे सर्व क्षेत्रातून कौतूक होत आहे. राहूल ने आपल्या यशाचे श्रेय वडील संजय वऱ्हाडे व आई दिपमाला वऱ्हाडे तसेच शिक्षकवृंद तथा मार्गदर्शकांना दिले आहे.

वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारा अवलिया लेखक

 वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारा अवलिया लेखक  आज ख्यातनाम लेखक सुहास शिरवळकर उर्फ सुशींचा वाढदिवस.तसे पाहिले तर माझ्या ह्या आवडत्या लेखकाने आपला निरोप घेऊन तब्बल सतरा वर्ष झाली आहेत.पण सुहास शिरवळकरांची कुठलीही कादंबरी आजही हातात घ्या ती तितकीच फ्रेश वाटते.सुहास शिरवळकर आपल्यात नाहीत ह्यावर आज देखील विश्वास बसत नाही. सुहासजींचा वाचक वर्ग तसा तरुणांपासून तर प्रौढांपर्यंत सर्वच होता.पण प्रौढांनाही तारुण्यात नेणारे अफलातून कसब सुहासजींच्या लेखनात होते.एखाद्या चांगल्या लेखकाला शासनाद्वारे पुरस्कारांच्या बाबतीत जशी प्रेरणा मिळायला पाहिजे तशी प्रेरणा कदाचित सुहास शिरवळकरांना राज्य शासनाकडून मिळाली नसेल.कमीतकमी ते डीझर्व करीत होते तितकी तर नक्कीच नाही. पण गेल्या काही पिढ्यांच्या तरुणाईवर मात्र सुहासजींनी अनभिषिक्त राज्य केले.देवकी नावाच्या चित्रपटासाठी त्यांना राज्यशासनाचा सर्वोकृष्ठ लेखक हा सन्मान मिळाला आहे.सुहास शिरवळकरांची कुठलीही कादंबरी हातात घेतली की संपल्या शिवाय वाचकाला चैन पडत नसे.पुढे काय होणार? हा प्रश्न कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय सुटत नसे आणि हीच सुहासजींच्या लेखनाचे आण...

ह.उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कुल ची यंदा सुद्धा उत्तुंग भरारी

ह.उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कुल ची यंदा सुद्धा उत्तुंग भरारी पुसद शहरातील उर्दू माध्यमातील सुप्रसिद्ध शाळा हजरत उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कूल ने यशाची परंपरा कायम ठेवून या वर्षी सुद्धा उत्कृष्ठ 99 टक्के निकाल दिला आहे. या मध्ये कु.तजीन फिदोस समीर खान या गुणवंत विद्यार्थीनी ने 95 टक्के घेतले तर मो.फुर्कान मो.इर्फान देशमुख याने 91% घेऊन यशाची भरारी घेतली आहे. सोबतच एकूण निकाला मध्ये उच्च श्रेणीत 46 विद्यार्थी आले असून एकूण विद्यार्थ्यां मध्ये 66 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत आले आहे. व द्वितीय श्रेणीत 50 विद्यार्थी आले आहे. शाळेतील एकूण 168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून. एकूणच निकाल 99 टक्के लागला आहे. या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक मो. वकील सर,व एजाजोद्दीन खतीब सर आणि वर्ग शिक्षक अब्दुल करीम सर,फहिमोद्दीन मलनस सर,निसार अहेमद सर तसेच सहाय्यक शिक्षक नवेद अहेमद सर,इर्फान अहेमद खान सर, नौशाद हुसैन सर, नदीम खान सर,सिमान मुद्दसिर सर, शेख इर्फान सर,अनस सर,सय्यद सलमान सर उमेर मिर्झा, मो.जुनेद सर या सर्व शिक्षकांना श्रेय जाते. तसेच शाळेतील शिक्षेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले...

पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचे मार्गदर्शन नविन शैक्षणिक धोरण,कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती

पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचे मार्गदर्शन नविन शैक्षणिक धोरण,कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती पुसद अर्बन बँकेचा उपक्रम नुकतेच केंद्रशासनाने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.तर दुसरीकडे कोरोनामुळे  अद्याप शाळा सुरू न झाल्याने पालक व विद्यार्थी द्विधा मनस्थितीत आहे. गावपातळीपासून ते महानगरांमध्ये सारखीच परिस्थिती असल्याचे लक्षात आल्यानंतर अत्यंत महत्वाच्या या विषयावर सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने पुसद अर्बन कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतुन व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन सुपर कॉम्प्युटर चे जनक , पदमभूषण ,नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती व पंतप्रधानांच्या सायंटिफिक ऍडव्हायजरी कमेटीचे सदस्य डॉ विजय भटकर यांचे नविन शैक्षणिक धोरण, कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती या विषयावर रविवार ९ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता भव्य वेबिनार चे आयोजन केले आहे. तसेच अमरावती तथा नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरु डॉ विलास भाले, डायलॉग इंडिया न्युज पेपर दिल्ली चे संपादक अनु...

सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांचे हाल; गुरुदेव युवा संघाचा आंदोलनांचा इशारा

सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांचे हाल;  गुरुदेव युवा संघाचा आंदोलनांचा इशारा  यवतमाळ :- कोरोना प्रादुर्भावाची नावावर सेतू सुविधा केंद्र बंद केल्याने नुकताच निकाल लागलेल्या १० वि १२ वि चे विध्यार्थी व शेतकरी याना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून खासगी सेतू केंद्राकडून नागरिकांची आर्थिक लूट केल्या जात आहे. तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र तातडीने सुरु करावे अशी मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.  12 वी आणि 10 वी चा निकाल लागला असल्याने विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी लागणारे कागदपत्र तहसिल कार्यालय यवतमाळ  येथील आपले सरकार सेतु सुविधा केंद्र सरकारने तथा कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाने मार्च ते आजरोजी पर्यंत कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी पूर्ण पणे सेतु केंद्र बंद ठेवले असुन सरकारी सेतु सुविधा केंद्रात अल्प दरात कामे होतात आणि हेच कागदपत्र काढण्यासाठी खाजगी सेतु सुविधा केंद्रात सर्व सामाण्यांची लुट होत असून या गंभीर बाबींन विषयी शासन वा प्रशासन दुर्लक्ष करून खाजगी सेतु सुविधा केंद्र सुरू ठेवुन सरकारी सेतु सुविधा के...

शेतकऱ्यांसारखी सकारात्मकता कोरोनाच्या भयावर प्रभावी उपाय- डॉ मिलिंद आपटे

शेतकऱ्यांसारखी सकारात्मकता कोरोनाच्या भयावर प्रभावी उपाय- डॉ मिलिंद आपटे  पुसद- आज कोरोना मुळे प्रत्येक क्षेत्रात अनिश्चितता निर्माण होऊन समाजाचा प्रत्येक घटक भयग्रस्त झाला आहे.मात्र ज्याप्रमाणे दरवर्षी  शेतीत नुकसान होत असले तरी पुढच्या वर्षी पुन्हा शेतीची मशागत करून पावसाची वाट पाहणाऱ्या  शेतकऱ्यासारखी सकारात्मकता बालगल्यास  कोरोनाच्या भयावर सहज मात करता येईल असे मौलिक विचार नागपूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ मिलिंद आपटे यांनी व्यक्त केले.  पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतून व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन काल   कोरोनाचा  व्यापारी ,कर्मचारी ,शेतकरी व सामान्य जनतेच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व उपाय या विषयावर आयोजित  वेबिनार मध्ये मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की आपली सुदृढ शरीर व  प्रतिकार शक्ती टिकवुन ठेवा, शारीरिक व मानसिक धैर्य ठेवा ,नकारात्मक विचाराला टाळा, पायी जास्त चाला ,घटनेनंतर नकारात्मक चर्चा  टाळून उपायावर बोला. कोरोनाला जीवनातील विराम समजा पुढील वर्षी सर्व व्यवसाय पुन्हा एकदा भरारी घेवुन दे...