सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांचे हाल;
गुरुदेव युवा संघाचा आंदोलनांचा इशारा
यवतमाळ :- कोरोना प्रादुर्भावाची नावावर सेतू सुविधा केंद्र बंद केल्याने नुकताच निकाल लागलेल्या १० वि १२ वि चे विध्यार्थी व शेतकरी याना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून खासगी सेतू केंद्राकडून नागरिकांची आर्थिक लूट केल्या जात आहे. तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र तातडीने सुरु करावे अशी मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
12 वी आणि 10 वी चा निकाल लागला असल्याने विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी लागणारे कागदपत्र तहसिल कार्यालय यवतमाळ येथील आपले सरकार सेतु सुविधा केंद्र सरकारने तथा कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाने मार्च ते आजरोजी पर्यंत कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी पूर्ण पणे सेतु केंद्र बंद ठेवले असुन सरकारी सेतु सुविधा केंद्रात अल्प दरात कामे होतात आणि हेच कागदपत्र काढण्यासाठी खाजगी सेतु सुविधा केंद्रात सर्व सामाण्यांची लुट होत असून या गंभीर बाबींन विषयी शासन वा प्रशासन दुर्लक्ष करून खाजगी सेतु सुविधा केंद्र सुरू ठेवुन सरकारी सेतु सुविधा केंद्र बंद करून सामाण्यांचे हाल करीत असल्याचे दिसून येत आहे तसेच निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील व शहरी भागातील वृध्दांचे हाल होतांना दिसत आहे.तसेच तहसिल कार्यालया जवळपास खाजगी सेतु मध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंग पाळल्याजात नाही व त्यांना कोरोना विषाणू चा परिणाम होणार नाही का? असा सर्व सामान्यांना प्रश्नच निर्माण झाला आहे
यासोबतच राशन कार्ड ऑनलाईन करणे, जातीचा दाखला काढणे, अधिवास प्रमाणपत्र आदींची आवश्यकता विध्यार्थ्यांना आहे. मात्र तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे थक्क असल्याने मोठी कुचंबना होत आहे. खासगी सेतू चालकांकडून अवाजवी रक्कम उकळल्या जात असल्याने सेतू केंद्र सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तहसील परिसरात अर्जनवीस म्हणून काम करणारे सुशिक्षित बेरोजगार यांची उपासमार होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सेतू सुविधा केंद्र तात्काळ सुरु करावे अन्यथा गुरुदेव युवा संघाचे वतीने गोरगरीब नागरिकासह तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी रत्नाबाई तेलंगे, ललिता धनगावकर , जोत्सना तेलंगे, नंदा इंगळे, देवक भजगवारे, संगीत गावडे, पुष्प खडसे,दादाराव तायडे, आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा