मुख्य सामग्रीवर वगळा
राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज वाटपाची गती वाढवावी

                                                -पालकमंत्री मदन येरावार

v दुष्काळ निवारणासंदर्भात आढावा बैठक

v जिल्ह्यात 33 के.व्ही. व 11 के.व्ही. साठी दुहेरी जोडणीचे नियोजन

        यवतमाळ, दि. 12 :  
दरवर्षीपेक्षा यावर्षी पीक कर्जासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे. शासनाने एनपीएची रक्कम बँकांना दिली आहे. त्यामुळे शेतक-यांना खरीप हंगामात वेळेवर पीक कर्ज मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जवाटपाची गती वाढवावी, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण व इतर विषयांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता राठोड आदी उपस्थित होते.
            जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांची पीक कर्ज वाटपाची गती कमी आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, पीक कर्जासाठी जिल्ह्यातील सर्व गावे बँकांना दत्तक देण्यात आली आहे. प्रशासनाने कर्ज वाटपाचा वारंवार आढावा घ्यावा. तसेच शेतक-यांना कर्ज वाटप अधिक गतीने कसे मिळवून देता येईल, याबाबत नियोजन करावे. दुष्काळग्रस्तांसाठी आलेला निधी शेतक-यांच्या खात्यात वेळेवर पोहचला पाहिजे, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. बँकांकडे पाठविण्यात आलेल्या यादीत चार-पाच बचत खात्यांच्या बाबतीत अनियमितता असेल तर सरसकट यादी परत पाठविणे योग्य नाही. यादीतील ज्या शेतक-यांचे खाते अचूक आहेत, अशा शेतक-यांच्या खात्यात त्वरीत निधी जमा झाला पाहिजे. येत्या चार-पाच दिवसांत दुष्काळनिधी शेतक-यांच्या खात्यात जमा करा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
            सद्यस्थितीत वादळी वा-यांमुळे विविध ठिकाणी खंडीत झालेला वीज पुरवठा विद्युत विभागाने युध्दपातळीवर सुरू करावा. तसेच जिल्ह्यातील सर्व 33 के.व्ही. व 11 के.व्ही. च्या कनेक्शनसाठी दुहेरी जोडणी बाबत प्रस्ताव तयार करावा. मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्यामुळे प्रशासनाने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना कराव्यात. याबाबत स्थानिक स्तरावर अधिकार देण्यात आले आहेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी पाणी टंचाई, चारा टंचाई, दुष्काळ निधी वाटप, बोंडअळी निधी वाटप, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, शिधापत्रिका वाढीव इष्टांक, मग्रारोहयो आदींचा आढावा घेतला.
            तर जिल्हा टँकरमुक्त आणि विहिर अधिग्रहणमुक्त करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले. काही ठिकाणी पाणी टंचाई नसतांना जाणीवपूर्वक टँकर सुरू असेल तर त्याची माहिती द्या. छोट्या छोट्या तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा योजना बंद असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्या, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू

  द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू यवतमाळ : 14 एप्रिल राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजतापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 'ब्रेक द चेन' अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. या कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी जिल्ह्याकरीता आदेश निर्गमित केले आहे.             संचारबंदीची अंमलबजावणी : संचारबंदीच्या कालावधी कोणत्याही व्यक्तिस अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या बाबी वगळता इतर सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रमे, सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवेमध्ये वर्गवारी केलेल्या सेवा व उपक्रम यांना कामकाजाच्या सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत मुभा राहील.             अत्यावश्यक सेवेमध्ये सुरू राहणा-या बाबी : रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने व औषधी कंपन्या, औषधी व आरोग्य सेवा व औषध निर्मिती करणारे कारखाने तसेच त्य...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट        पुसद : महानायक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे नवनियुक्त पुसद आदिवासी विकास समिती अध्यक्ष तथा आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य प्रतिमेची भेट देण्यात आली. बिरसाचे विचार समस्त युवकांनी अंगीकारून वंचितांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन भेट सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी सर , जी प सदस्य गजानन उघडे , वसंता  चिरमाडे , पुंडलिक  टारफे , श्रीकांत चव्हाण , राज्य संघटक जीवन फोपसे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कर्मचारी संघटनेचे तालुका सचीव संदेश पांडे , आ.विकास परिषदेचे सचिव सुरेश बोके , श्री खूपसे , जयवंत भुरके , तुकाराम भुरके , समाधान टारफे , गंगाराम काळे साहेब , रामदास शेळके , विजय टारफे , दत्ता भडंगे , दशरथ भुरके , समाधान चोंढकर , हनुमान गोदमले , भगवान सुरोशे , सुरेश पित्रे , बालाजी शे...