मुख्य सामग्रीवर वगळा
सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - मायावती
बसपा सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी किंवा बिगरसरकारी रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी दिले आहे. त्या नागपुरात बोलत होत्या. मोदींनी अच्छे दिनचे आश्वासन पूर्ण केलेले नाही. आताही ते पुन्हा वारेमाप आश्वासन देत सुटले आहेत, अशी टीका त्यांनी केली. विदर्भातील बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेचे आयोजन नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानात करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. 

बहुजन समाज पक्ष सत्तेत आल्यास गरिबांना प्रती महिना ६ हजार देण्याऐवजी आम्ही रोजगार देऊ, असे मायावती यांनी सांगितले. पाच वर्षांपूर्वी भाजपने दिलेले १५ लाखांचे आश्वासन आता विनोदाचा विषय बनला आहे. काँग्रेसने देखील अनेक वर्षे अशा प्रकारचे प्रलोभन जनतेला दिले आहे. मात्र ही सगळी आश्वासने आणि प्रलोभने 'हवा-हवाई' ठरली.

या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने पैशे देण्याचा आश्वासन दिले आहे. मात्र यामुळे गरिबांना काही स्थायी मदत मिळणार नाही. कारण राज्यात आणि केंद्रात दर पाच वर्षांनी सत्ता परिवर्तन होत राहते, असे मायावती यावेळी म्हणाल्यात. त्यामुळे आम्हाला केंद्रात सत्ता बनवण्याची संधी मिळाली तर आम्ही गरिबांना ६ हजार महिना देण्याऐवजी त्यांना सरकारी आणि गैरसरकारी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणार असे मायावती यांनी स्पष्ट केले.

गरिबीची ही समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक हाताला रोजगार दिल्यावरच दूर होऊ शकते. त्यामुळे काँग्रेस किंवा भाजपच्या आश्वासनाला गरिबांनी बाळू पडू नये, असेही आवाहन मतदारांना मायावती यांनी यावेळी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

जिल्ह्यात २ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी

 जिल्ह्यात २ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी यवतमाळ जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसोबत इतर सेवेची दुकाने २ जून पासून १५  जून सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून सदर दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी दिले आहेत.  ब्रेक दि चेन अंतर्गत घालून दिलेले निर्बंध दिनांक ०१ जून, २०२१ रोजी जश्याच्या तश्या लागू राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व निर्बंधांसाह  सुरु राहतील. *2 जून पासून सुरू असलेल्या सेवा*  १. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इ. खाद्य पदार्थाची दुकाने (ज्यामध्ये चिकन,मटन, मच्छी आणि अंडयांची दुकाने) आठवडयाची सातही दिवस सकाळी ७.०० ते दु...