मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जिल्हाधिका-यांच्या संकल्पनेतून ई-पास सुविधा तालुकास्तरावर नागरिकांना होणार उपलब्ध यवतमाळ, दि.4 : विदर्भ मुकाबला- कोव्हिड-19 चा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग जिवाची पर्वा न करता उत्कृष्ट कार्य करीत आहे. तसेच या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी व लॉकडाऊनच्या या काळात प्रत्यक्ष बाहेर जाणे टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येणारी पास आता अधिक सुलभरित्या मिळण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या संकल्पनेतून ‘ई-पास’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी आता जिल्हास्तरावर येणे आवश्यक नसून संबंधित तहसीलदारांना हे अधिकार देण्यात आले आहे. संगणक शास्त्रात अभियंता आणि व्यवस्थापन शास्त्राची पदवी असलेले तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात पाच वर्षे खाजगी नोकरी करणारे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी  पुणे येथील ‘लाईफ फस्ट’ कॉनसेप्ट ॲन्ड टेक्नॉलाजी प्रा. लिमिडेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर शहा यांच्या सहकार्याने अवघ्या चार दिवसात...
यवतमाळ शहरातील भाजी मंडी पुर्ववत सुरु पासधारक व आधारकार्ड धारकांनाच मिळणार प्रवेश यवतमाळ, दि. 30 : विदर्भ मुकाबला- यवतमाळ शहरातील स्थानिक विठ्ठलवाडी येथील भाजी मंडीमध्ये ठोक भाजीपाला खरेदी 1 मे 2020 पासून सुरुवात करण्यात येत आहे. पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी कोव्हिड –19 च्या प्रादुर्भावात सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर भाजी मंडी सुरु करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याअनुषंगाने यवतमाळ शहरामध्ये एकूण 24 ग्रीन झोन विभागातील मैदान व जागेत दररोज सकाळी 8 ते 12 या कालावधीत भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ठोक भाजीपाला विक्रेते व ठोक खरेदीदार, हातगाडीधारक हे भाजीपाल्याचा व्यवहार दररोज सकाळी 3 ते 6 वाजता दरम्यान विठ्ठलवाडी मार्केट मंडीमध्ये करतील. फक्त पासधारक व आधारकार्ड धारकांनाच प्रवेश मंडीत मिळेल. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील व्यापारी व खरेदीदार यांना प्रवेश मिळणार नाही. तसेच कोणत्याही चिल्लर व वैयक्तिक ग्राहकांना प्रवेश नाही. सकाळी 6 वाजता सदर भाजी मंडी बंद करण्यात येईल. कोणत्याही संशयीत व्यक्तीने ...

मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम

मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम ‘उमेदच्या’ बचत गटाच्या महिलांनी तयार केले पाच लाख मास्क यवतमाळ, दि. 28 :  सद्यस्थितीत कोरोना विषाणुचे संकट सर्व जगावर पसरले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे नागरिकांनी ‘मास्क’ वापरणे हाच आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून यवतमाळ जिल्हा ग्रामीण व विकास यंत्रणेच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) च्या बचत गटातील महिला पुढे सरसावल्या. नागरिकांसाठी मास्क निर्मितीचे काम या महिलांनी हाती घेतले आणि पाहता पाहता मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम ठरला. उमेदच्या महिलांनी एक, दोन नव्हे तब्बल 5 लाख 15 हजार 775 मास्क एका महिन्याच्या काळात तयार केले.   यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 1422 उमेदच्या महिला बचत गटांनी मास्क शिवण्याचे काम हाती घेतले. या कामासाठी जिल्ह्यातून बचत गटाच्या 2466 महिला पुढे आल्या. या महिलांनी 5 लक्ष 15 हजार 775 मास्कची निर्मिती करून एक उच्चांक गाठला. विशेष म्हणजे संकटाच्या या काळात ‘ना नफा ना तोटा’ या संकल्पनेतून त्यांनी मास्कची निर्मिती केल...
 643 युवकांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी घ्यावी-आमदार इंद्रनील नाईक यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघात मागील काही महिन्यांपासून तामिळनाडू या राज्यातील ६४३ युवक प्रशिक्षणासाठी वास्तव्यास होते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण देशात अचानक ताळेबंदी करण्यात आली. त्यामुळे हे युवक पुसदला अडकून पडले. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु आपल्या गावी परतण्यासाठी ते सतत पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी कर्तव्यदक्ष युवा आमदार इंद्रनिल नाईक यांना विनंती करीत आहेत.  यासंदर्भात आमदार इंद्रनिल नाईक यांनी तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री ई. पलाईस्वामी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहून या सर्व 643 युवकांची त्यांच्या गृहराज्यात जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.
आ.डॉ वजाहत मिर्झा व आ.इंद्रनील नाईक यांच्या हस्ते कोरोना सेफ्टी किट वाटप. पुसद :-  रविवार  दिनांक २६-०४-२०२० रोजी आमदार डॉ वजाहत मिर्झा यांच्या कडून उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर,आरोग्य सेवक,कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी 20 कोरोना सेफ्टी किट पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी कर्तव्यदक्ष आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक व विधानपरिषद सदस्य तथा यवतमाळ जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा यांच्या हस्ते देण्यात आली.          यावेळेस दोन्ही आमदारांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी व रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांना आणखी काय सुविधा उपलब्ध करता येईल याबाबतही माहिती घेतली.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ हरिभाऊ फुफाटे, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, डॉ अमोल मालपाणी,उपजिल्हा रुग्णालयाचे अशासकीय सदस्य अरविंद चव्हाण, इंद्रनील नाईक मित्र मंडळाचे सदस्य अभिजित पवार,अयुक खतीब,खासदार राठोड, रोहन राठोड, प्रथमेश मुदगुले, आदी उपस्थित होते.
गाण्‍याच्‍या माध्‍यमातुन महसूल विभागातील अव्‍वल कारकुनाची ‘कोरोना’ जनजागृती श्री जनार्दन बापुराव बावणे यांचे जि.प. शिक्षक मित्र श्री संदीप इंगळे व शिलवंत इंगोले या दोघांनी लिहुन दिलेले कोरोना जनजागृती वरील गाणे श्री बावणे यांनी स्‍वतः गायन करुन कोरोनाबाबत जनजागृती केली. या गाण्‍याची चर्चा सध्‍या सोशल मिडियावर सुरु आहे. श्री बावणे हे उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुसद (महसूल विभाग) येथे अव्‍वल कारकुन या पदावर कार्यरत आहे. त्‍यांना गाण्‍याची आवड आहे. सर्वत्र कोरोना या विषाणुचा हाहाकार माजलेला असुन बरेच लोक रस्‍त्‍यावर विनाकारण भटकत असतात, कोरोनाबाबत जनजागृती करण्‍यासाठी प्रशासनाला मदत व्‍हावी, या उद्देशाने त्‍यांनी हे गाणे लोकप्रिय गाण्‍याच्‍या चालीवर गायिले आहे.  व्‍हाट्अप, फेसबुक, युट्युबवर त्‍यांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्‍याबाबतचा व्हिडीओ प्रसारित केला असून सोशल मिडियावर सदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. सहज-सोप्‍या शब्‍दांचा वापर करुन रचलेल्‍या या गाण्‍याच्‍या माध्‍यमातुन कोरोना आजाराला घाबरुन न जाता घरातच थांबण्‍याबाबत तसेच शासनाच्‍या निर्देशाचे पालन करुन प्र...
रमजानच्या महिन्यात शासन व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा v   कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर मुस्लीम बांधवांना आवाहन यवतमाळ, दि. 22 :  कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) संसर्गामुळे आरोग्यविषयक आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन अनेक उपाययोजना करीत आहेत. त्यातच नजीकच्या काळात मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता रमजानच्या महिन्यात मुस्लीम बांधवांनी शासन व प्रशासनाच्या सुचनांचे कोटेकोरपणे पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहे. रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशीदमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. तसेच या काळात मुस्लीम समाजातील बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. सध्याची स्थिती लक्षात घेता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यातून जीवितहानीसुध्दा होऊ शकते. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लीम समाज बांधवांच्या आरो...