संचारबंदी मध्ये तिन्ही आमदारांनी पुसद मधील गरीब गरजू जनतेला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करावे.
ए आई एम आय एम पुसद च्या वतीने निवेदनाद्वारे मागणी.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला कमी करण्याच्या उद्देशाने पुसद मधील तिन्ही आमदार मा.इंद्रिनिल नाईक, मा.डॉ. वजाहत मिर्झा, मा.ऍड.निलय नाईक यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना विंनती करून पुसद मध्ये दिनांक २१ जुलै ते २८ जुलै पर्यंत संचारबंदी लावण्यास भाग पाडले होते.
परंतु या संपूर्ण प्रक्रियेत जनतेला सहभागी न करता राजकिय आणि प्रशाकासकीय लोकांद्वारे संचार बंदी दिनांक २१ जुलै ते २८ जुलै पर्यंत करण्यात आली होती.
ती संचारबंदी सुद्धा पुसद येथील गोरगरीब जनतेने खूप काटेकोरपणे पालन केली आता २९ जुलै पासून गोरगरीब जनतेला काही राहत मिळेल अशी आशा असतांना पुन्हा पुसद चे तिन्ही आमदारांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देवून संचारबंदी वाढविण्यासाठी विनंती केली.
परंतु या तिन्ही आमदारांनी जनतेच्या समस्यांना न पाहता ही संचार बंदी पुन्हा वाढविण्याची शिफारस केली त्यामुळे पुसद येथील गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.आणि खाण्या पिण्यासाठी हाल होत आहे. परंतु आमदार मंडळी शहरातील काही श्रीमंत मंडळीचा विचार करीत आहे असे आरोप देखील ए आय एम आय एम शाखा पुसद तर्फे लावण्यात आले आहे तसेच निवेदनात नमूद आहे की ज्या लोकांचे जीवन पोट हातावर घेऊन जगतात,रोजमजुरी करून कुटुंबाच उदरनिर्वाह करतात त्या सर्व पुसद मधील गरीब जनतेला हे तिन्ही आमदारांनी त्वरित राशन किट वाटप करावे अशी मागणी पुसद शहर ए आई एम आय एम च्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचे कड़े केली आहे.
आमदार ऍड.इंद्रनील नाईक, आ.डॉ. वजाहत मिर्झा, आ. ऍड.निलेय नाईक यांनी ए आई एम आई एम पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मागणी ची दखल घेऊन पुसद शहर व तालुक्यातील सर्व गरीब जनतेला तात्काळ जीवनावश्यक वस्तू राशन किटच्या स्वरूपात त्वरित वाटप करून दिलासा द्यावा हीच मांगणी सर्व गरीब जनतेकडून देखील होत आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी पुसद यांचे मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आला निवेदन देते वेळी एम आय एम शहराध्यक्ष सय्यद सिद्दीकोद्दीन, मोहमद जिब्रान सोबतच मजलिस चे कार्यकर्ते उपस्थित होते.
ए आई एम आय एम पुसद च्या वतीने निवेदनाद्वारे मागणी.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला कमी करण्याच्या उद्देशाने पुसद मधील तिन्ही आमदार मा.इंद्रिनिल नाईक, मा.डॉ. वजाहत मिर्झा, मा.ऍड.निलय नाईक यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना विंनती करून पुसद मध्ये दिनांक २१ जुलै ते २८ जुलै पर्यंत संचारबंदी लावण्यास भाग पाडले होते.
परंतु या संपूर्ण प्रक्रियेत जनतेला सहभागी न करता राजकिय आणि प्रशाकासकीय लोकांद्वारे संचार बंदी दिनांक २१ जुलै ते २८ जुलै पर्यंत करण्यात आली होती.
ती संचारबंदी सुद्धा पुसद येथील गोरगरीब जनतेने खूप काटेकोरपणे पालन केली आता २९ जुलै पासून गोरगरीब जनतेला काही राहत मिळेल अशी आशा असतांना पुन्हा पुसद चे तिन्ही आमदारांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देवून संचारबंदी वाढविण्यासाठी विनंती केली.
परंतु या तिन्ही आमदारांनी जनतेच्या समस्यांना न पाहता ही संचार बंदी पुन्हा वाढविण्याची शिफारस केली त्यामुळे पुसद येथील गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.आणि खाण्या पिण्यासाठी हाल होत आहे. परंतु आमदार मंडळी शहरातील काही श्रीमंत मंडळीचा विचार करीत आहे असे आरोप देखील ए आय एम आय एम शाखा पुसद तर्फे लावण्यात आले आहे तसेच निवेदनात नमूद आहे की ज्या लोकांचे जीवन पोट हातावर घेऊन जगतात,रोजमजुरी करून कुटुंबाच उदरनिर्वाह करतात त्या सर्व पुसद मधील गरीब जनतेला हे तिन्ही आमदारांनी त्वरित राशन किट वाटप करावे अशी मागणी पुसद शहर ए आई एम आय एम च्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचे कड़े केली आहे.
आमदार ऍड.इंद्रनील नाईक, आ.डॉ. वजाहत मिर्झा, आ. ऍड.निलेय नाईक यांनी ए आई एम आई एम पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मागणी ची दखल घेऊन पुसद शहर व तालुक्यातील सर्व गरीब जनतेला तात्काळ जीवनावश्यक वस्तू राशन किटच्या स्वरूपात त्वरित वाटप करून दिलासा द्यावा हीच मांगणी सर्व गरीब जनतेकडून देखील होत आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी पुसद यांचे मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आला निवेदन देते वेळी एम आय एम शहराध्यक्ष सय्यद सिद्दीकोद्दीन, मोहमद जिब्रान सोबतच मजलिस चे कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा