मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन लाखांवर दंड वसूल. 👉🏻 517 प्रकरणामध्ये कारवाई 👉🏻 मास्क न वापरणाऱ्यांची प्रकरणे सर्वाधिक        यवतमाळ, दि. 18 : मुकाबला न्यूज़ संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणा-यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून दोन लाखांवर दंड वसूल करण्यात आला असून एकूण 517 प्रकरणात ही कारवाई केली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-यांची प्रकरणे सर्वाधिक आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये विविध अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, सामाजिक अंतर ठेवणे, किराणा दुकानात दर्शनी भागात दरपत्रक लावणे यासारख्या विविध सूचनांचा समावेश आहे. तरीदेखील या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 517 प्रकरणात एकूण 2 लाख 11 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजन...
दारव्हा येथील हॉटेल अश्विन बार ॲन्ड रेस्टॉरंटचा परवाना रद्द 👉🏻 दहा दिवसांत जिल्हाधिका-यांची तीन रेस्टॉरंटवर कारवाई यवतमाळ, दि. 18 : मुकाबला न्यूज़, कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) संसर्गाच्या अनुषंगाने आपात्कालीन आरोग्य विषयक परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध उपाययोजन राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्ह्यात साथरोग नियंत्रण अधिनियम व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन करून संचारबंदीच्या काळात अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या दारव्हा येथील हॉटेल अश्विन रेस्टॉरंट व बारचा परवाना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व नियमावली अस्तित्वात आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मद्यविक्री व त्याची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून हेमंत नामदेवराव चिरडे यांच्या मालकीच्या दारव्हा येथील हॉटेल ...
प्रतिसाद फाऊंडेशनचे सदस्य जयेश दखणे व अफरोज परवेझ यांची अनोखी समाजसेवा यवतमाळ - प्रति. शहरामध्ये सामाजिक व सेवा कार्यात अग्रेसर असलेल्या प्रतिसाद फाऊंडेशनचे सदस्य जयेश दखणे व अफरोज परवेझ या कोरोना योद्धांनी यवतमाळ शहरातील सामाजिक क्षेत्र पोलीस व्हॅन, अनेक मंदिर, मस्ज़िद, बँक परिसर व प्रशासकीय कार्यालय व प्रशासनाच्या कामकाजाकरिता वापरण्यात येणार्‍या प्रायव्हेट गाड्या तसेच अनेक धार्मिक स्थळांना सॅनिटायझर करुन कोरोना संसर्गा दरम्यान आपले अनमोल असे योगदान दिले आहे तसेच प्रतिसाद फाऊंडेशनला जेवणाच्या डब्ब्यासाठी जवळपास 1 आठवडा पुरेल ईतका भाजीपाला व काही धान्य स्वताच्या खर्चातून प्रतिसाद फाऊंडेशनच्या कार्यालयात उपलब्ध करुन दिला तसेच सॅनिटायझेशनसाठी लागणारे साहित्य तसेच फवारणीसाठी लागणारी औषध सुद्धा त्यांनी स्व खर्चातून विकत आणून आगळ्या वेगळ्या पद्धतीने कोरोना योद्धांच्या सेवेत आपले योगदान देऊन आपले सामाजिक दायित्व जोपासले यांच्या या कार्यासाठी प्रतिसाद फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाणे यांचे अनमोल असे मार्गदर्शन मिळाले. तसेच प्रतिसाद फाऊंडेशनचे सदस्य संदीप शिंदे, भगवान भगत, श्रीपाद ढोले...
ब्रेकिंग न्यूज : यवतमाळात ३३ लोकांची रिपोर्ट निगेटिव्ह ......... आइसोलेशन वॉर्ड मध्ये भरती असलेल्या 33 लोकांचे रिपोर्ट्स आज १३ एप्रिल रोजी सकाळी नेगेटिव्ह आले आहेत. काल ४० लोकांचे नेगेटिव्ह रिपोर्ट्स प्राप्त झाले होते व आज ३३ असे एकूण ७३ लोकांचे रिपोर्ट्स नेगटिव्ह आले असून ही नक्कीच दिलासा देणारी बाब आहे. अजून जवळपास १०० लोकांचे रिपोर्ट्स प्रलंबित असल्याचे जिल्हा प्रशासनने कळविले आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वताला होम क्वारंटाईन करुण घेतले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी होम क्वारंटाईन करून घेतले आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून जितेंद्र आव्हाड त्याच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी घरी सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनमधील अधिकारी नाशिकमध्ये गेल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्याच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या ३३ पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांचे सँम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. दरम्यान, या अधिकाऱ्याच्या संपर्कात काही पत्रकार आणि अन्य लोकही आले होते. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्यांच्या मतदारसंघात पाहणीसाठी गेले होते. मुंब्रा, कळवा भागात फिरताना हा अधिकारीही संपर्कात आला होता. त्यामुळे आव्हाड यांनी कोरोनाची टेस्ट करून घेत घरीच सेल्फ क्वारंटाईन केले आहे. आव्हाड यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आ...
महावितरणचा बिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊनची मर्यादा वाढवण्यात आली. ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे राज्यातील अनेक उद्योग धंदे आणि व्यवसाय बंद केलेले आहेत. यामुळे बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर मागणीला पुढील ३ महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे महिवतरणकडून लॉकडाऊननंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड आकारला जाणार नसल्याची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार माफ करण्यात यावा, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती. ही मागणी मान्य करून डॉ. नितीन राऊतांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. महत्वाचे म्हणजे ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास सरासरी वीजबिल आकारण्यात येणार आहे. मे २०२० मध्ये एएमआरमार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येणार आहे.  लॉकडाऊनच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा वीजवापर झाला नसल्याचे समजून लॉकडाऊनच्या कालावधीतील...
लॉकडाऊन दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर केलं असताना या दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. वर्ध्यामध्ये एकाच दिवसात ५५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी रेल्वे स्टेशन, आर्वी नाका, शिवाजी चौक, विक्रमशिला नगर, सिविल लाइन या परिसरात पोलिसांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर कारवाई केलीये. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांची ही कारवाई सुरु असून मॉर्निंग वॉक करणाऱ्या एकूण ११० जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. लोकडाऊनच्या काळात मॉर्निंग वॉक कारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आज 27,500 रुपये मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांकडून पोलिसांनी दंड म्हणून वसूल केले. रविवारी सेवाग्राम परिसरात २९ लोकांकडून ५०० रुपये प्रमाणे १४५०० रुपयाचा दंड वसूल तर तीन दिवसा अगोदर ही 26 लोकांवर कारवाई  करण्यात आली होती. आजपासून जिल्ह्यात कठोर कारवाई सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनाने आता दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. 1) मॉर्निंग वॉक व विनाकारण घराबाहेर फिरणे- 500 रुपयाचा दंड आणि फोटो काढून प्रसिद्धी 2) सकाळी 7 ते 2 विनाकार...