मुख्य सामग्रीवर वगळा

पुसदच्या वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा वीज ग्राहकांना फटका, बकरी ईदच्या दिवशीही वारंवार वीज पुरवठा खंडीत

पुसदच्या वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा वीज ग्राहकांना फटका, बकरी ईदच्या दिवशीही वारंवार वीज पुरवठा खंडीत 


प्रतिनिधी/पुसद

गेल्या दोन दिवसापासून पुसद तालुक्यात पावसाची हजेरी लागत आहे. अशातच वीज पुरवठा देखील वारंवार खंडित होत आहे. गेल्या दोन दिवसापासून गोविंदनगर, काकडदाती अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील परिसर श्रीरामपूरसह आदी भागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. पुसद शहरातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना तर बकरी ईदचा दिवस विजेविना व अंधारातच साजरी करण्याची वेळ येत आहे.यामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाकडे वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी ग्राहकाकडून आता होत आहे.

पुसदच्या विज वितरण विभागाचे अभियंता यांच्याकडून नियोजनशून्य कारभाराचा वीज ग्राहकांना फटका बसत आहे. पुसद शहरातील व ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी कामाचा विसर पडल्यामुळे अनेक ठिकाणी डीपी जवळाल्याच्या व तार तुटल्याच्या घटना घडत आहे. वीज वितरण विभागाचे अभियंताकडून वीज वितरण विभागाने नियुक्त केलेल्या त्या ठेकेदाराला जाब सुद्धा विचारल्या सुद्धा जात नाही हे विशेष. वीज वितरण विभागाच्या इंजिनियरकडून नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसत आहे.तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना भर पावसाळ्यात देखील रात्रभर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. पुसद तालुक्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला तरी देखील विद्युत पुरवठा खंडित होत आहे. पुसदच्या वीज वितरण विभागाच्या अभियंताकडून पावसाळ्यापूर्वीचे कामे कागदावरच दाखविल्याचा आरोप वीज ग्राहकांकडून होत आहे.तर अनेक कामे कागदोपत्री दाखवून फोटोबाजी करीत असल्याचा आरोप देखील वीज ग्राहकाकडून होत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे  थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसामुळे व पाऊस पडलेला नसला तरीदेखील पुसद शहरातील व आजूबाजूच्या ग्रामीण भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे.यामुळे शहरात राहणाऱ्या विज ग्राहकांसह व्यापारी वर्गांना सुद्धा याचा जबर फटका बसत आहे.गेल्या दोन दिवसापासून व दि.२१ जुलै रोजीच्या बकरी ईदच्या दिवशी पुसद शहरातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तर वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे वीज ग्राहकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बिघडत असल्याच्या घटना आता समोर येत आहे. पावसाळयाला सुरूवात होऊन दोन महिने होत असतांना पुसदच्या वीज वितरण विभागाचे अभियंताकडून नियोजन शून्य कारभार पहावयास मिळत आहे.याचा फटका तालुक्यातील वीज ग्राहकांना बसत असून देखील वीज बिल भरून देखील मानसिक व इतर समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे.त्यामुळे वरिष्ठांनी तात्काळ या गंभीर बाबीची दखल घेऊन पुसदच्या वीज वितरण विभागाच्या अभियंत्यांना जाब विचारण्याची मागणी ग्राहकाकडून आता होत आहे.



गेल्या दोन दिवसापासून तांत्रिक अडचण निर्माण होत आहे

काकडदाती,गोविंद नगर, अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील भागात राहणाऱ्या ग्राहकांचा वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे.तो तांत्रिक कारणामुळे होत आहे. गेल्या दोन दिवसापासून त्या तांत्रिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळेच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. तेथील समस्या सोडविण्यासाठी यवतमाळ येथे आम्ही फिडरची मागणी केली आहे.ते आल्यावरच परिसरातील ग्राहकांच्या समस्या सुटतील. तोपर्यंत वीजग्राहकांना अडचणीला सामोरे जावे लागेल.-राजपुत,सहा.अभियंता, वीज वितरण विभाग,पुसद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...